Breaking News

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन : 'या' यात्रेत दरवर्षी घडणाऱ्या अनुचित घटना टाळण्यात यश







गडचिरोली TODAY 
गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली तसेच देऊळगांव-आवळगाव यात्रेत दरवर्षी अनुचित घटना घडायच्या. मात्र, यावर्षी  जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.  
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे यावर्षी प्रथमच जिल्हयातील सिरोंचा येथील उरूस तसेच विविध तालुक्यातील सोमनुर, गुमलकोंडा, वेकंटापूर, वांगेपल्ली, चपराळा, मार्केडा, वैरागड, देऊळगांव- आवळगाव, पळसगाव, अरततोंडी, डोंगरी या ठिकाणी 18 फेब्रुवारी पासुन महाशिवरात्री निमीत्ताने विविध यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रांमध्ये यात्रा आपत्ती  व्यवस्थापनाकरीता प्रथमच जिल्हयातील प्रशिक्षीत 300 आपदा मित्रांचा समावेश करण्यात आला होता.
 जिल्हयातील विशेषत: मार्कंडा येथील यात्रेमध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडु नये, याकरीता एसडीआरएफ नागपूर येथील 26 जवानांचे पथक, पोलीस विभागातील बचाव पथक, बोट व इतर बचाव साहित्यासह तसेच आपदा-मित्र व आपदा-सखी यांचे पथक यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आले होते. सदर केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयातील सर्व यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यात आलेल्या असून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. 
विशेषत: मार्कंडा यात्रेमध्ये प्रंचड गर्दी अनुभवास मिळाली तसेच पळसगाव तालुका आरमोरी येथे 26 फेब्रुवारी रोजी प्रंचड मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली. दरवर्षी वांगेपल्ली तसेच देऊळगांव –आवळगाव यात्रेत अनुचित घटना घडायच्या. मात्र, यावर्षी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही तसेच यावर्षी देऊळगांव-आवळगाव मार्ग बंद करण्यात आलेला होता. आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने जिल्हयातील सर्व आपदा मित्रांनी महत्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.

No comments